Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारात येणार नाही

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (20:13 IST)
Onion purchased by NAFED  नाफेडने खरेदी केलेला कांदा हा स्थानिक बाजारात येणार नसल्याने कांद्याचे भाव पडणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
केंद्र सरकारने नाफेडने कांदा बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत सूचना जाहीर केल्यानंतर कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून कोसळण्याचे अंदाज बांधून त्या स्वरूपाच्या अफवादेखील पसरवल्या जात होत्या. या सर्वांवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले, की मी स्वतः नाफेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नाफेडच्या वतीने जो कांदा बाजारात आणला जाणार आहे, तो नाशिक नव्हे, तर देशातील विविध राज्यांनी केलेल्या मागणीनुसार त्या राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे हा कांदा स्थानिक बाजारात येणार नाही.
 
त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव पडणार नाहीत, असे स्पष्ट करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या, की काही हितचिंतक आणि काही विरोधक अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करीत आहेत, जेणेकरून कांद्याचे माहेरघर असलेल्या लासलगाव, पिंपळगाव व अन्य ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, असे नियोजन केले जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन ना. डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments