Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी ! विराट कोहलीने कर्णधार पदावरून राजीनामा दिला,रोहित शर्मा नवा कर्णधार

Webdunia
सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (10:44 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या कर्णधार पदावरून राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.येत्या T20 विश्वचषकात नंतर एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद विराट कोहली सोडणार असून रोहित शर्मा त्याजागी कर्णधार पदाची धुरा सांभाळणार.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधारपदी कायम असणार आहे. मात्र एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. विराट कोहली नंतर रोहित शर्मा कर्णधार पदासाठी योग्य असल्याचे मानले आहे.रोहित शर्माने IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले आहे.त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच वेळा IPL जिंकले आहे.
 
मागील दोनवर्षापासून विराट कोहलीच्या कामगिरीत फरक झाल्याचे दिसून येत आहे.येत्या T20 विश्वचषक आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक सामन्यासाठी विराटला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार असून आपली कामगिरी सुधारण्यावर भर द्यावे लागणार.कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय सामन्यात 95 पैकी 65 सामने जिंकले आहे.कसोटी सामन्यात 65 पैकी 38 जिंकले आहे.तर T20 सामन्यात 45 पैकी 29 सामने जिंकले आहे.
 

संबंधित माहिती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments