Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs NZ Records:रोहितने जयसूर्याला मागे टाकले, गिलने तोडला धवनचा विक्रम

Webdunia
बुधवार, 25 जानेवारी 2023 (11:18 IST)
कर्णधार रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (112) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध 9 बाद 385 धावा केल्या आणि सामना 90 धावांनी जिंकला. न्यूझीलंड विरुद्ध भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. याआधी 2009 मध्ये क्राइस्टचर्चमध्ये भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात 392 धावा केल्या होत्या. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतासाठी न्यूझीलंडविरुद्ध वनडेतील सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी 2009 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी हॅमिल्टनमध्ये नाबाद 201 धावा जोडल्या होत्या.
 
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे त्याचे तीन वर्षे 1101 दिवसांतील पहिले शतक आहे. 19 जानेवारी 2020 रोजी बंगळुरूमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले.
 
रोहितने या शतकासह रिकी पाँटिंगच्या तीस शतकांची बरोबरी केली. आता फक्त विराट कोहली (46) आणि सचिन तेंडुलकर (49) एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात त्याच्यापेक्षा वर आहेत. रोहितने आपल्या इनिंगमध्ये सहा षटकार ठोकले. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला (270) मागे टाकत त्याच्याकडे आता वनडेत 272 षटकार आहेत. रोहित 27व्या षटकात बाद झाला. त्याने 85 चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि सहा षटकार मारले. रोहित आणि गिलने विक्रमी भागीदारी करताना 22 चौकार आणि दहा षटकार मारले.
 
रोहितने पहिले शतक सव्वीसव्या षटकात पूर्ण केले आणि तीन चेंडूंनंतर, 23 वर्षीय गिलने 72 चेंडूत शतक पूर्ण केले, चार डावातील तिसरे शतक. याआधी त्याने हैदराबादमध्ये याच मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये 208धावा केल्या होत्या आणि तिरुवनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. ही त्याची 21वी खेळी होती आणि सर्वात कमी डावात चार शतके झळकावणारा तो भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता, ज्याने 24 डावात 4 शतके झळकावली होती.  
 
शुभमन गिलने या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकूण 360 धावा केल्या. यात एका द्विशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात 208 धावा करणाऱ्या गिलने दुसऱ्या सामन्यात नाबाद 40 आणि तिसऱ्या सामन्यात 112 धावांची खेळी केली. अशाप्रकारे त्याने या मालिकेत एकूण 360 धावा केल्या. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गिलने या बाबतीत पाकिस्तानच्या बाबर आझमची बरोबरी केली. 
 
बाबर आझमने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 360 धावा केल्या होत्या. या मालिकेत शुभमन गिलने विराट कोहलीचा विक्रमही मोडला. आता शुभमन गिल भारताकडून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गिलने तीन सामन्यांच्या मालिकेत २८३ धावा करणाऱ्या विराट कोहलीला मागे सोडले.

Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

भारतीय उपकर्णधार स्मृती मंधाना वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ठरली

जसप्रीत बुमराह 2024 चा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला

भारताचा अर्शदीप सिंग 2024 चा सर्वोत्कृष्ट पुरुष T20 खेळाडू बनला

तिसऱ्या T20 मध्ये भारताचे प्लेइंग 11 असे असू शकते

रविचंद्रन अश्विन यांना पद्मश्री, पीआर श्रीजेश यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार

पुढील लेख
Show comments