Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

Webdunia
शनिवार, 30 मे 2020 (12:52 IST)
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद  काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला आहे. 
आयसीसी स्पर्धेदरम्यान करात सूट मिळण्यासाठी बीसीसीआयसोबत 2016 पासून वाद सुरू आहे. 17 एप्रिलपर्यंत मंडळाला त्याबाबत आयसीसीला माहिती द्यायची होती. मात्र, 24 मार्चपासून लॉकडाउन असल्याने 30 जूनपर्यंत वेळ मागितला होता. बीसीसीआयने सरकारला 6 पत्रे लिहून ही बाब कळवली. आयसीसीचे जोनाथन हॉलने पत्र लिहून म्हटले, अनेक वर्षांपासून बीसीसीआयकडे हे प्रकरण सोडवण्याची संधी होती. तुम्ही पाऊल उचलले नाही. 
 
आयसीसीची आज टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. यात ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार्या टी-20 विश्वचषकावर चर्चा होईल. स्पर्धेला 2022 पर्यंत स्थगित केले जाऊ शकते. मात्र, त्यावर अखेरचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या एका सदस्याने म्हटले की, बैठकीत विश्वचषक स्थगित होण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा होईल की नाही केवळ हा प्रश्न आहे. विश्वचषक स्थगित केला गेल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते.
 
बीसीसीआयने कराच्या प्रकारात गंभीर नाही अशा आयसीसीच्या प्रतिक्रियेला अमान्य केले. एका अधिकार्यााने म्हटले की, आम्ही आयसीसीला सरकारशी चर्चा केलेल्या पत्रासंबंधी माहिती दिली.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

GT vs DC : आज दिल्ली-गुजरात IPL सामना कोण जिंकणार? दोन्ही संघात चुरशीचा सामना

CSK vs LSG: लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला

T20 विश्वचषकाबाबत सुनील नारायणची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments