वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.मात्र यात मोठा बदल झाला असून महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताची धुरा रोहित शर्माकडे आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीला ही विश्रांती दिली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेचे नेतृत्त्व मात्र विराट कोहलीकडेच असणार असून, दोन्ही मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी युव रिषभ पंतकडे सोपवली आहे. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी एखाद्या मालिकेसाठी पहिल्यांदाच धोनीला संघाबाहेर केल्यामुळे क्रिकेटचाहत्यां मध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
विंडीजविरुद्ध टी२० मालिकेचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव आणि शाहनाझ नदीम.