Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय बोलिंग अटैक आपल्या प्रदर्शनाने हल्ला मचावायला तयार आहे

Webdunia
गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (12:44 IST)
टीम इंडियाच्या मजबूत बोलिंग अटैकने भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्याच घरी पराभूत करून त्यांना अचंभित केलं. एक वेळी जेव्हा टीम इंडियाचा गोलंदाजी विभाग अतिशय मंद असायचा, तर आज या भारतीय टीममध्ये असे-असे गोलंदाज आहे ज्यांच्या गतीने मोठे-मोठे फलंदाज चिंताग्रस्त होतात. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या तीन वर्षांपासून भारतीय गोलंदाजांचे भविष्य चमकले आहे. 2016 पासून आजपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास भारताचा बोलिंग अटैक सर्वात धोकादायक आहे.
 
ते बरोबर आहे की कोणत्याही गोलंदाजाची वास्तविक अग्नी परीक्षा टेस्ट क्रिकेटमध्ये विदेशी मातीवर होते. तथापि, या प्रकरणात भारतीय गोलंदाजांचा झंडा बुलंद आहे. गेल्या तीन वर्षात टीम इंडियाच्या गोलंदाजांची सरासरी 25 आहे, अर्थातच जगातील सर्वोत्तम. 
 
या यादीत टीम इंडियानंतर, दुसर्‍या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. घरगुती जमिनीवर तर दक्षिण आफ्रिकाच रेकॉर्ड अजून चांगला आहे, पण टीम इंडिया देखील जास्त मागे नाही आहे. मोठी गोष्ट म्हणजे, टीम इंडियाचे गोलंदाज घर आणि परदेशात दोन्ही जागी समान प्रदर्शन करीत आहे. 
 
2016 ते 2019 पर्यंतचे आकडा बघितला तर परदेशात सर्वाधिक विकेट घेतलेल्या शीर्ष 3 गोलंदाज भारतीय आहे. त्यातील टॉपवर जसप्रीत बुमरा आहे, ज्याने 20 डावांमध्ये 49 विकेट घेतले आहे. ईशांत शर्माने 26 डावांमध्ये 45 आणि शामीने 36 डावांमध्ये 68 विकेट घेतले आहे. 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परदेशात भारतीय स्पिनर्सचे प्रदर्शन देखील जोरदार राहिले आहे. आश्विनाने 26 डावांमध्ये 58 विकेट आणि जडेजाने 11 डावांमध्ये 30 विकेट घेतले आहे. स्पष्टपणे टीम इंडियाचा गोलंदाजी युनिट मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये कठोर लढा घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्याने इतिहास रचला आहे. 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments