suvichar

जसलोक हॉस्पिटल करीत आहे ३०० कोटींची गुंतवणूक

Webdunia
गुरूवार, 16 मे 2019 (11:59 IST)
जसलोक हॉस्पिटलने सांगितले की, संचालक मंडळाने सुविधा वाढविण्यासाठी पुढील पाच ते सहा वर्षात ३०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य संचालकांकडून चांगले प्रतिसाद मिळाल्यानंतर संस्थेने स्वत:च विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय संचालकांसह सहा बोलीदारांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापने मध्ये स्वारस्य दर्शविले होते.
 
या विकासाबद्दल चर्चा करत आणि बाजारातील सर्व कल्पनांना विचारात घेऊन, जसलोक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरयाण यांनी सांगितले की, "रुग्णालयात झालेल्या संचालक ट्रस्ट मंडळ बैठकी मध्ये रुग्णालयाच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. विस्तारीत योजनेत अतिरिक्त ५० हजार चौरस फूट जमीन जोडणे आणि पुढील पाच-सहा वर्षांत ३०० कोटी रुपयांची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात येणार आहे. नियोजनात्मक चर्चा केल्यानंतर, जसलोकच्या व्यवस्थापनाने निरंतर सुधारणा करण्याच्या ध्येयासह नूतनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली आहे, तसेच डॉकटर आणि रूग्णांकडून अभिप्राय मागवले आहेत. २०२३ मध्ये नूतनीकरण पूर्ण होणा-या हॉस्पिटल मध्ये केवळ नैदानिक ​​उत्कृष्टताच नव्हे तर अनुभवात्मक पुनर्प्राप्ती देखील निश्चित असेल. उत्कृष्टतेसह ,वैद्यकीय संस्था उपचारांच्या प्रगतीशील पद्धतींकडे लक्ष केंद्रित करेल, म्हणून आम्ही संस्थेमध्ये विशेष विभागीय दृष्टिकोन, आर्ट मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डे केअर सुविधा, संशोधन केंद्र अशा अनेक सुविधांचा विस्तार करणार आहोत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

ट्विशा शर्मा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार; एम्सचे पथक भोपाळमध्ये दाखल, पुन्हा शवविच्छेदन केले जाणार

पुढील लेख
Show comments