Festival Posters

माघार कुणी घ्यायची?

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (16:49 IST)
आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही? 
 
जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? 
 
अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वत:चा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला.
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments