Dharma Sangrah

नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

Webdunia
गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (16:11 IST)
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी नाट्य परिषदेच्या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी निकम म्हणाले की, कोरोनामुळे गेल्यावर्षी सारे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारही प्रदान करण्यात आले नाहीत. यंदा रंगभूमी दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमधील साहित्य संमेलन झाल्यानंतर या पुरस्काराने मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहेत. नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे यांचा या पुरस्कार सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.
 
यांना मिळाले पुरस्कार
दीपक करंजीकर यांना दत्ता भट स्मृती अभिनय पुरुष पुरस्कार, विद्या करंजीकर यांना शांता जोग स्मृती अभिनेत्री स्त्री पुरस्कार, प्रदीप पाटील यांना प्रभाकर पाटणकर स्मृती दिग्ददर्शन पुरस्कार, दत्ता पाटील यांना नेताजी तथा दादा भोईर स्मृती लेखन पुरस्कार, सुरेश गायधनी यांना वा. श्री. पुरोहित स्मृती बालरंगभूमी पुरस्कार जाहीर झाला आहे. धनंजय वाखारे यांना जयंत वैशंपायन स्मृती सांस्कृतिक पत्रकारिता पुरस्कार, विनोद राठोड यांना गिरीधर मोरे स्मृती प्रकाशयोजना पुरस्कार, जितेंद्र देवरे यांना रामदास बरकले स्मृती लोककलावंत पुरस्कार, राजेंद्र जव्हेरी यांना शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार, राजेंद्र तिडके यांना विजय तिडके स्मृती रंगकर्मी कार्यकर्ता पुरस्कार, नारायण चुंबळे, निवृत्ती चाफळकर, संगीतकार संजय गीते आणि नितीन वारे यांना शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे नाट्य परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

गुरुदेवांच्या ७० व्या जन्मोत्सवनिमित्त जागतिक शांततेचा संदेश; १८२ देशांतील लाखो लोकांनी सामूहिक ध्यानात सहभाग घेतला

‘महालक्ष्मी सरस २०२६’ हे यावर्षी संपूर्ण राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले

मोदी सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली; साखर कारखाने आणि जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम होईल?

२००८ च्या रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणात राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर, सर्व आरोप फेटाळले

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंबईसह राज्यात ४० ठिकाणी छापे

पुढील लेख
Show comments