rashifal-2026

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (12:09 IST)
आपण धोक्यांपासून सुरक्षित राहावे अशी प्रार्थना न करता त्यांना तोंड देत असताना निर्भय होण्यासाठी प्रार्थना करुया.
 
आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.
 
आम्ही महानतेच्या सर्वात जवळ तेव्हा असतो जेव्हा आम्ही नम्रपणात महान असतो.
 
आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.
 
कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.
 
मातीच्या बंधनापासून मुक्ती झाडासाठी आजादी नव्हे.
 
कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.
 
नेहमी तर्क करणारा विचार धारदार चाकू समान आहे जो वापरणार्‍याच्या हातातून रक्त काढतोचं.
 
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
 
जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.
 
चंद्र आपला प्रकाश संपूर्ण आकाशात पसरवतो परंतू कलंक स्वत:जवळ ठेवतो.
 
जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
 
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
 
फक्त प्रेमच वास्तविकता असते, ती केवळ भावना नसते. हे एक परम सत्य आहे जे सृष्टीच्या हृदयात राहतं.
 
मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
 
ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.
 
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
 
थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
 
निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.
 
विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
 
एखाद्या मुलाचे शिक्षण आपल्या ज्ञानापुरते मर्यादित ठेवू नका कारण त्याचा जन्म दुसर्‍या वेळी झाला आहे.
 
परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.
 
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
 
पात्रातील पाणी नेहमी चमकत असते आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद असते. लघु सत्याचे शब्द नेहमीच स्पष्ट असतात, महान सत्य मौन असतं.
 
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.
 
प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.
 
प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.
 
फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
 
महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मुस्लिम समाजात अन्नात थुंकण्यामागील तर्क काय? खरंच अशी परंपरा आहे का?

"थुंकून तंदुरी रोटी बनवली" रेस्टॉरंट कामगार जावेदच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल बिल, रिक्षा भाडे आणि बस प्रवासावर विशेष सवलत मिळेल

"मी मुख्यमंत्री असताना त्यांना कधीही उपमुख्यमंत्री मानले नाही," फडणवीसांशी झालेल्या संघर्षाच्या वृत्तांवर शिंदे यांचे मोठे विधान

सावधान! मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव; 'व्होट बँक' की शहरावर कब्जा?

पुढील लेख
Show comments