Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (12:08 IST)
महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, महात्मा फुलें पासून ते आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीर असे अनेक. समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.
 
ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी ,मातंग , गारूडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकऱ्या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.
 
एकदा पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून त्याच्या अनावरणासाठी ब्रिटनचा सम्राट प्रिन्स आॅफ वेल्सला निमंत्रित करून पुण्यात आणले व महाराजांच्या पुतळ्याला सम्राटाला मुजरा करण्यास भाग पाडले असा हा पराक्रमी आणि मत्सुद्दी राजा होता. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. धनगर मराठा विवाह घडवून आपली उक्ती आणी कृती एकच आहे हे समाजाला दाखवून दिले.
 
ते कलासक्त होते आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत. एकदा नाटक पहातांना शिवाजी महारांजांच्या भूमिका करणाऱ्या तरूणाला त्यांनी लवून मुजरा केला. ते कुस्त्यांचे चाहते होते आजही कोल्हापूरात उत्तम मल्ल तयार होतात ती महाराजांनी दिलेली देणगी आहे.
 
राज्यातील शेतकरी शेतमजूरांची ते काळजी घेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले . कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता. आजही महाराजांच्या कार्याचा अलौकीक ठसा  कोल्हापूर परिसरात दिसून येतो. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते. एकदा जंगलात अस्वल त्यांच्या अंगावर आले असतांना त्यांनी त्याचा सक्षमपणे मुकाबला केला होते. 
 
एकदा व्हाईसरायने संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी देशातील सर्व संस्थानिकांना निमंत्रीत केले होते. त्यामध्ये महाराज आपल्या शरीरयष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचासारखा पराक्रमी प्रजेचे हीत पहाणारा साहित्य कला संस्कृतीची पाठराखण करणारा. समाजवादी समाजरचनेचा स्विकार करणारा राजा होणे नाही.
 
शेतकरी,कारागीर,कलाकार,विद्यार्थी गोर गरीब यांची ते काळजी घेत शेवटी दि. ६ मे १९२२ रोजी त्यांच निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन..! 
सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक, राहुल गांधीची उपस्थित, काँग्रेसने दिली ही सूचना

LIVE: "आम्ही दोघे, आमचे दोघे ठाकरेंची परिस्थिती अशीच राहील"-बावनकुळे

फडणवीसांनी शिंदेच्या आमदारांची वाय सुरक्षा काढून घेतली, शिंदे यांनी बैठक बोलावली, नाराज आमदार शिवसेना सोडतील का?

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने २ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

पुढील लेख
Show comments