Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगार तरुणांचे होणार स्वप्न पूर्ण दीड लाख पदांची होणार भारती, वाचा कोणी केली घोषणा

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (10:32 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वातवरणात फार मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आगोदर 72 हजार पदं भरण्याचं जाहीर केले होते, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी  प्रक्रिया सुरु असल्याने अधिक माहिती राज्य सरकार लवकरच प्रसिद्ध करणार आहे. 
 
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र नोकरीची जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची घोर निराशा होते, तर दुसरीकडे अनेकांचे वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा होत नाही, मात्र या घोषणेमुळे अनेकांच्या सरकारी नोकरीच्या इच्छा जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे सरकार लवकरच घोषणा करणार असून  अनेक तरुणांना योग्य ते काम मिळणार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments