Dharma Sangrah

वाईट काळापासून मुक्ती हवी असल्यास 9 चमत्कारिक उपाय

Webdunia
जर आपल्यावर ग्रहांची वाईट दशा सुरू असेल आणि आपण संकटातून निघत असाल किंवा आपण काही काळापासून अनेक समस्यांना सामोरा जात असाल किंवा आपली आर्थिक मानसिक स्थिती स्थिर नसेल आणि आपल्याला जाणवत असेल की वाईट दिवस किंवा काळ सुरू आहे तर हे अचूक उपाय आपल्यासाठी आहे- 
 
आज आम्ही आपल्याला लाल किताबमध्ये सांगितलेले काही उपाय सांगत आहोत आणि हे उपाय करण्यात कुठलेही किंवा कोणाचेही वाईट नाही. 
 
1 . हनुमान चालीसा पाठ : सर्वात आधी आपण नियमित हनुमान चालीसा पाठ करणे सुरू करावे. दररोज संध्यावंदन करताना हनुमान चालीसा पाठ करावा. संध्यावंदन घरात किंवा मंदिरात सकाळ-संध्याकाळ केली जाते. पवित्र भावना आणि शांतिपूर्वक हनुमान चालीसा पाठ केल्याने हनुमानाची कृपा प्राप्ती होते ज्याने प्रत्येक प्रकाराची कळत-नकळत घडणार्‍या अप्रिय घटनांपासून रक्षा होते. हनुमान चालीसा पाठ केल्यानंतर हनुमानाची कापुराने आरती करावी.
 
हनुमानाला चोला चढवा : 5 वेळा हनुमानाला चोला अर्पित करावा याने लगेच संकटांपासून मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त दर मंगळवार आणि शनिवारी वडाच्या झाडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमान मंदिरात ठेवून यावा.  असे किमान 11 मंगळवार किंवा शनिवार करावे.
 
2. नारळ ओवाळणे : पाणी असलेले नारळ घ्यावं आणि स्वत:वरून 21 वेळा ओवाळून घ्यावं. ओवाळ्यानंतर नारळ एखाद्या देवस्थानावर जाऊन अग्नीत जाळून द्यावं. असं कुटुंबातील संकटाला समोरा जात असलेल्या सदस्यावरून देखील ओवाळू शकता. हा उपाय देखील मंगळवार किंवा शनिवारी करावा. 5 शनिवार असे केल्याने जीवनात अचानक येणार्‍या कष्टापासून मुक्ती मिळेल. घरातील सदस्याची तब्येत बरी नसल्यास देखील हा उपाय उत्तम ठरेल.
 
3. गाय, कुत्रा, मुंगी आणि पक्ष्यांना भोजन द्या : वृक्ष, मुंगी, पक्षी, गाय, कुत्रा, कावळा, अशक्त मानव इतर प्राण्यांसाठी अन्न-जलाची व्यवस्था केल्याने त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतात. या वेदांच्या पंचयज्ञातून एक 'वैश्वदेव यज्ञ कर्म' म्हटले गेले आहे. हे सर्वात मोठे पुण्य काम आहे.
 
मासोळ्यांना खाऊ घाला : कागदांवर लहान-लहान अक्षरांमध्ये राम-राम असे लिहा. अधिकाधिक संख्येत हे नाव लिहून सर्वांना वेगवेगळं कापा. आता कणेकेच्या लहान-लहान गोळ्या तयार करा आणि एक-एक कागदात त्या गुंडाळून नदी किंवा तलावात मासोळ्यांना आणि कासवाला खाऊ घाला. कासव आणि मासोळ्यांना नियमित कणेकेच्या गोळ्या आणि मुंग्यांना भाजलेल्या कणकेची पंजीरी खाऊ घाला.
 
* दररोज कावळ्याला किंवा पक्ष्यांना दान घातल्याने पितृ तृप्त होतात.
* दररोज मुंग्यांना दाना घातल्याने कर्जापासून आणि संकटापासून मुक्ती मिळते.
* दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने आकस्मिक संकट दूर राहतात.
* दररोज गायीला पोळी खाऊ घातल्याने आर्थिक संकट दूर होतात.
 
4. जल अर्पण : एका तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या त्यात जरासं लाल चंदन मिसळा. ते पात्र रात्रभर आपल्या उशाशी ठेवून झोपा. सकाळी उठून सर्वात आधी त्यातील पाणी तुळशीला अर्पित तरा. असे काही दिवस करत राहा, हळू-हळू आपल्या समस्या दूर होतील.
 
5. सावली दान करा : शनिवारी एका कांस्याच्या वाटीत मोहरीचं तेल आणि शिक्का टाकून त्यात आपली सावली बघा आणि तेल मागणार्‍यांना देऊन द्या किंवा एखाद्या शनी मंदिरात शनिवारी वाटीसह तेल ठेवून या. हा उपाय किमान पाच शनिवारी तरी करावा याने शनीची पीडा शांत होई आणि शनी देवाची कृपा सुरू होईल.
 
6. जप केल्याने मिळेल संकटांपासून मुक्ती : सर्व प्रकाराचे वाईट काम सोडून दररोज राम नाम, गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करावा. यातून केवळ एकाच मंत्राचा जप करायचा हे लक्षात असू द्या. जप आणि सकाळी आणि संध्याकाळी करावा. 
 
किमान 43 दिवसांपर्यंत निरंतर जप करावा. या जपाचा प्रभाव सुरू झाल्यावर संकट हळू-हळू दूर होतील. हा जप करताना खोटं बोलू नये, तामसिक भोजन टाळावे, कोणत्याही प्रकाराचा नशा करू नये नाहीतर वाईट परिणामांना सामोरा जावं लागू शकतं. रामाच्या नावाचा जप तर आपण दिवसभर करू शकता. कलियुगात राम नावाहून मोठा उपाय नाही.
 
7. गूळ आणि तुपाचा नैवेद्य : हिंदू धर्मात धूप देणे आणि दिवा लावण्याचं अत्यंत महत्त्व आहे. सामान्य पद्धतीने धूप दोन प्रकारे दिली जाते. पहिली गुग्गुल-कापुराने आणि दुसरी गूळ आणि तुपाचा मिसळून जळत असलेल्या  गोवरीवर ठेवून. येथे गूळ-तुपाच्या धुपाचे अधिक महत्त्व आहे.
 
गूळ आणि तुपाची धूप दर एकादशी, तृतीया, चतुर्दशी, अमावस्या आणि पौर्णिमा या व्यतिरिक्त ग्रहणाला द्यावी. हे धूप केवळ देवतांच्या निमित्ताने द्यावं.
 
8. स्मशानात शिक्के टाका : जर शव यात्रेत सामील झाला असाल तर परत येताना स्मशानात काही शिक्के फेकून यावे. परत येताना वळून बघू नये. या उपायाने अचानक येणार्‍या समस्या नाहीश्या होतात आणि दैवीय मदत मिळते.
 
9. घरात मासोळ्या ठेवा : घरात अॅक्वेरियम ठेवून त्यात 8 सोनेरी आणि एक काळी मासोळी ठेवा. अॅक्वेरियम उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेकडे ठेवा. त्यातील एखादी मासोळी मृत झाल्यास नवीन मासोळी त्याला सामील करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

Guru Pradosh Vrat 2026 पूजा पद्धत; गुरुवारी प्रदोष व्रताचे महत्त्व आणि कसे पाळावे?

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

अपरा एकादशी व्रत कथा Apra Ekadashi 2026 Vrat katha

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments