Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खाण्यापिण्यातून ग्रह करा प्रसन्न

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:07 IST)
ग्रहांचा आणि खाण्यापिण्याचा जवळचा संबंध आहे. तुमच्या ग्रहांची स्थिती काय आहे, यावरही तुमचे खाणे अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. तुमची बिघडलेली ग्रहस्थिती ताळ्यावर आणण्यासाठी काही प्रमाणात खाणेही परिणामकारक ठरू शकते. त्याचवेळी तुमच्यावर नाराज असलेल्या ग्रहाच्या कोपापासून वाचण्यासाठी खाण्यापिण्यातही काळजी घ्या. त्यासाठी खाली दिलेले सल्ले नक्कीच उपयोगी पडतील. 
 
१. मंगळ वक्री असेल तर मग मसालेदार पदार्थ टाळा. संत्रे, चिकू जास्त खा. पाणी जास्त प्या. लठ्ठपणा वाढविणारे पदार्थ व फास्ट फूडपासून दूर रहा. 
 
२. शुक्राची वक्रद्रृष्टी तुमच्यावर असेल तर मग ती दूर करण्यासाठी पांढर्‍या रंगाचे पदार्थ खा. साबूदाणा वगैरे. चीज, पनीर, दही यांचा समावेश रोजच्या जेवणात करा. सफेद बर्फी खा. इतरांना खाऊ घाला. 
 
३. बुधाचे तुमच्याशी वाकडे असेल तर सलाड भरपूर खा. मुगाची डाळही आहारात घ्या. खिचडी हा तर चांगला पर्याय आहे. हिरव्या भाज्यांचे सूप फायदेशीर ठरू शकते. 
 
४. सूर्याचा ताप होत असेल तर फळे जास्तीत जास्त खा. बाहेर खाणे टाळा. आठवड्यात एकदा तरी उपास पाळा. मांसाहार टाळा. नेहमीचेच जेवण जेवा. रविवारी मीठ खाऊ नका. 
 
५. गुरू अनुकूल नसल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करा. केळे खा. पिवळी बर्फी, फळ खा. आपल्या शिक्षकांनाही ते द्या. आठवड्यातून एकदा चण्याची डाळ खा. लठ्ठपणा वाढविणारे पदार्थ खाऊ नका. 
 
६. चंद्र कमजोर असेल तर दूध व त्यापासून बनलेले पदार्थ जास्त खा. पाणी भरपूर प्या. मसालेदार पदार्थ कमी खा. तांदळाची खीर सोमवारी खा. 
 
७. शनी त्रास देत असेल तर मांसाहार घेऊ नका. नशा करू नका. राजमा, उडीद, सरसोचे तेल वापरू नका. त्याऐवजी ते दान करा. 
 
हे उपाय अगदी साधे आहेत. पण करून तर बघा. किती सकारात्मक परिणाम होतो ते अनुभवा.

संबंधित माहिती

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

पुढील लेख
Show comments