Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्र ग्रहण 2020 : तीन तासांहून जास्त काळाचे ग्रहण, सुतक कालावधी आणि उपाय जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 4 जून 2020 (07:08 IST)
यंदा जूनच्या महिन्यात दोन ग्रहण पडणार आहेत. पहिले ग्रहण 5 जून रोजी आहेत. हे चंद्र ग्रहण अनेक दृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि काही राशींसाठी चेतावणी आणि काहींसाठी आनंदी असणार आहेत. चंद्र ग्रहणा बाबत आपल्याला विशेष काळजी घ्यावयाची आहे. बऱ्याच वेळा असे आढळून आले आहेत की लोकं याला दुर्लक्षित करतात. पण ह्याचा थेट परिणाम आपल्या जीवनांवर पडतो.  
 
5 जून रोजी लागणाऱ्या या ग्रहणाची कालावधी 3 तास आणि 18 मिनिटाची असणार. या दिवशी काय करायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे.  
 
चंद्रग्रहण म्हणजे काय?
चंद्र पृथ्वीच्या अगदी पाठी असतो त्या खगोलशास्त्रीय स्थितीला चंद्रग्रहण म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार हे फक्त पौर्णिमेलाच होणं शक्य असतं.
 
चंद्रग्रहण कधी असणार?
भारतीय वेळेनुसार 5 जून रोजी रात्री 11:16 वाजता होणारे हे ग्रहण पुढील तारखेला म्हणजेच 6 जून रोजी रात्री 2:32 वाजे पर्यंत असणार.
 
कोणत्या राशींवर ग्रहण असणार?
ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार हे ग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रांवर लागणार आहे.  
 
सुतक काळ म्हणजे काय?
या दरम्यान एक अशुभ वेळेची सुरुवात होणार आहे, त्यावेळेस स्वतःला जपण्याची विशेष गरज असणार. हे सुतक काळ चंद्रग्रहणाच्या तब्बल 9 तासांपूर्वीच सुरू होणार आणि ग्रहणाच्या बरोबरच संपणार. म्हणजेच रात्री 2 वाजून 32 मिनिटांवर.
 
ग्रहणाच्या दरम्यान काय सावधगिरी बाळगावी?
काही धर्मगुरुंच्या म्हणण्यानुसार ग्रहण काळात काही अश्या गोष्टी आहे ज्या टाळल्या पाहिजेत, नाही तर त्याचा दुष्प्रभाव आपल्या जीवनांवर पडू शकतो. सुतक काळाच्या वेळी बऱ्याच नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असतं. म्हणूनच त्याच वेळी आपल्या काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 
* या दरम्यान देवाची पूजा करू नये. मूर्तीस स्पर्श करू नये. जवळपासच्या देऊळाचे दार देखील बंद करायला हवं. असे घरामध्ये देखील केले पाहिजे.
* कोणतेही शुभ कार्य या काळात करू नये. कारण त्यापासून कोणताही फायदा मिळणार नाही.
* गरोदर बायकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ग्रहण काळात त्यांनी घरातून बाहेर पडू नये. तसेच चंद्राला बघू नये. असे केल्यास आई आणि बाळावर त्याचा दुष्प्रभाव पडतो.
* ग्रहण काळात चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नये. याचा वाईट दुष्प्रभाव गर्भाशय वर पडतो.
* या दरम्यान स्मशानभूमीच्या ओवती-भोवती फिरू नये. कारण या वेळी नकारात्मक शक्ती बळकट होते.
* शक्य असल्यास या काळात काहीही शिजवू नये आणि खाऊ देखील नये.
* ग्रहण काळात नख, दाढी आणि केस कापू नये.

संबंधित माहिती

हनुमान जयंतीला मारुतीच्या 1000 नावांचा जप केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या 10 आश्चर्यकारक फायदे आणि पद्धत

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

CSK vs LSG: लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला

T20 विश्वचषकाबाबत सुनील नारायणची मोठी घोषणा

आक्षेपार्ह भाषणप्रकरणी नितीश राणे आणि गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप 200 पण पार करणार नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा,राज्य सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments