Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे 5 उपाय करा

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (20:38 IST)
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ज्या गोष्टींना लक्षात ठेवायचे आहे त्यांना समजून घेणं महत्त्वाचे आहे. काही लोक घोकमपट्टी करून लक्षात ठेवतात. परंतु हे काही काळच लक्षात राहते. कालांतरानंतर त्या गोष्टी विसरायला होतात. आपण विध्यार्थी असल्यास बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.  गोष्टींना लक्षात ठेण्यासाठी स्मरण शक्ती वाढविण्यासाठी हे 5 उपाय अवलंबवा. 
 
1 समजून घ्या - आपण वर्गात शिकत असाल तर आपल्याला जे काही विषय शिकवतात, त्या विषयात चांगले लक्ष देण्यासाठी त्यांच्या वर लक्ष देऊन त्यांना समजून घेण्याची गरज आहे. समजून घेतल्याने ते चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. म्हणून नेहमी गोष्टी समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. 
 
2 स्मरण शक्ती वाढविण्यासाठी मन एकाग्र करा-
स्मरण शक्ती वाढविण्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये मन लावा. एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयामध्ये मन एकाग्र करणे आवश्यक आहे.सध्या मुलं अभ्यासासह संगीत ऐकतात. अशा परिस्थिती मन कसे एकाग्र होणार. आणि आपल्याला काहीच लक्षात राहणार नाही.म्हणून नेहमी अभ्यास करताना लक्ष अभ्यासाकडे असावे. संगीत ऐकण्यावर नाही.  
 
3 वर्तमान गोष्टींकडे लक्ष द्या- 
स्मरण शक्ती वाढविण्यासाठी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. आपण वर्गात बसला आहात आणि शिक्षक शिकवणी घेत आहे. आपले लक्ष बाहेर किंवा भूतकाळातील एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले असल्यास आपल्याला शिकवलेले लक्षात राहणार नाही. स्मरण शक्ती वाढविण्यासाठी नेहमी वर्तमानात जगणे शिका. असं केल्याने शिकवलेला अभ्यास लक्षात राहील आणि विषय अवघड वाटणार नाही.  
 
4 लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवा- 
आपले मेंदू असीम गोष्टींना लक्षात ठेवते. गरज आहे त्यांना योग्यरीत्या वापरण्याची. आपल्याला स्मरणशक्ती वाढवायची आहे तर त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण गणिताचे विद्यार्थी असाल तर फार्मुले लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. असं केल्याने आपल्याला ते फार्मुले पाठ होतील आणि आपण त्यांना न बघता देखील लिहू शकाल. असं का होतें. जेव्हा आपण लिहून ठेवता तेव्हा आपण आपल्या लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवता आणि मेंदूने देखील सहकार्य केले या मुळे आपल्याला फार्मुले पाठ झाले. 
 
5 सतत लक्षात ठेवण्याचा सराव करा- 
एखादी गोष्ट कायमची लक्षात ठेवण्यासाठी सतत त्या गोष्टीची उजळणी केली पाहिजे. आपल्याला असे वाटत आहे की आपण त्या विषयाला विसरत आहोत तर पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी . असं केल्याने ते लक्षात राहील.

संबंधित माहिती

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

पुढील लेख
Show comments