rashifal-2026

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?

Webdunia
सोमवार, 19 एप्रिल 2021 (09:25 IST)
प्रत्येकाची आंघोळीची पद्धत ठरलेली असते. कोणाची आंघोळ अवघ्या पाच मिनिटांमध्ये उरकते तर काहींना बराच वेळ लागतो. काहीजण आधी केस धुतात तर काही शारीरिक स्वच्छतेनंतर केसांवर पाणी ओततात.

आंघोळीदरम्यान तोंड धुवायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंघोळ करतानाच आपण चेहराही साबणाने किंवा फेसवॉशने धुवून घेतो. असे करणे चुकीचे असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे मत आहे. आंघोळीकरता वापरले जाणारे पाणी बरेच गरम असल्याने या पाण्याने चेहरा धुवू नये. 
 
शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत चेहर्याची त्वचा नाजूक असते. म्हणूनच गरम पाण्यामुळे ती खराब होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल होणे अशा समस्या निर्माण होत असल्याने आंघोळीचे पाणी तोंड धुण्यासाठी वापरू नये. पाणी जेवढे गरम तेवढी चेहर्याआची त्वचा कोरडी पडण्याचा धोका जास्त असतो. चेहर्याची त्वचा गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने पिगेंट्‌स स्रवणचे प्रमाण वाढते. त्वचेचा रंग बदलण्याचा धोकाही असतो. त्वचेचा पाण्याशी  जास्त संपर्क येणे हे सुद्धा आंघोळीदरम्यान तोंड न धुण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. आंघोळीचा वेळ कमी करणे गरजेचे आहे. फक्त पाच ते दहा मिनिटात आंघोळ उरकायला हवी. त्यामुळे शक्यतो  बेसिनमध्ये तोंड धुवा. असे केल्याने आंघोळीचा वेळ कमी होतो आणि त्वचेचा पाण्याशी फार संपर्क येत नाही. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी आंघोळ लवकरात लवकर आटपा. दिवसातून फक्त एकदा कोमट पाण्याचे आंघोळ करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

प्रत्येक घासात गोड-आंबट चव; नक्की बनवून पहा टोमॅटो ढोकळा रेसिपी

हिवाळ्यात या प्रकारे तीळ खा, तुमचे शरीर निरोगी राहील

भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भरती: 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी

फेसवॉश नाही तर स्वयंपाकघरातील हे घटक चेहरा उजळवणार

फुलकोबी खाल्ल्यानंतर गॅसचा त्रास होतो, अशा प्रकारे सेवन करा

पुढील लेख
Show comments