Publish Date: Sat, 27 Jun 2020 (12:34 IST)
Updated Date: Sat, 27 Jun 2020 (12:38 IST)
"आपण एक दाणा पेरला असता,
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं.
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
"पेरणी चालू आहे.."
काय पेरायच हे आपल आपणच ठरवायच