Marathi Biodata Maker

दृष्टिकोण

ऋचा दीपक कर्पे
"काय ही आजकालची मुलं! तरुण वयातच ह्यांची गुडघी काय दुखतात, कंबर काय अखडते! सकाळी उठून भराभरा कामाला लागायचं ते तर कुठेच गेलं...सतत बाम चोळत राहतात नि गोळ्या खात राहतात. तरी आमच्यासारखी कबाडकष्ट करावी लागली नाहीत. न धुणं न भांडी न केरवारा.." बागेत बाकावर बसल्येल्या आजीबाई आजोबांसोबत बोलत होत्या."
 
अगं काळ बदलत चालला आहे. आजकालची मुलं मेहनतीची कामं कमी करतात. त्यांचं जीवन यांत्रिक झालं आहे. सगळ्या कामांसाठी मशीनी आहेत. पायी चालायला नको, जीने चढा-उतरायला लिफ्ट असते. एक बटण दाबलं की सारी कामं होतात. सादा टीव्ही चा आवाज जरी वाढवायचा असेल तरी रिमोट आहे!!" आजोबा उत्तरले."
 
हो न! आपण निदान तो लैंड लाईन फोन वाजला की कसे धावात जायचो ..आता तर चोविस तास तो मोबाईल हातातच असतो." 
 
"सारं जग रिमोट मय झालंय. काही वर्षानंतर तर लोकं एका जागेवरून हलणार सुद्धा नाही, सारे काम बसल्या जागेवरूनच करतील का कोण जाणे!!" आजोबांच्या बोलण्यात एक काळजी होती.
  
त्याच बागेत व्हीलचेअर वर फिरायला आलेली ती मात्र हा संवाद ऐकून सुखावली. एक सोप्पं आणि आत्मनिर्भर भविष्य तिच्या डोळ्यात तरंगत होते. 
 
©ऋचा दीपक कर्पे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

सुगंधी 'आलू दम पुलाव' रेसिपी; चवीला अतिशय उत्कृष्ट आणि बनवायला अगदी सोपी

World Book Day 2026 जागतिक पुस्तक दिन : डिजिटल युगात पुस्तकांचं महत्त्व

उन्हाळ्यात आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

POWERGRID Recruitment 2026 : पॉवरग्रीडमध्ये ६६० पदांसाठी भरती, अर्जसुरु

उन्हाळ्यात मेकअप टिकत नाही,या सोप्या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments