Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वात मौल्यवान वस्तू

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
एकदा राजा कृष्णदेव राय एका राज्याला जिंकून आपल्या नगरात परतले. त्यांनी मिळवलेल्या विजयामुळे संपूर्ण नगर आनंदात होते. नगर पूर्ण सजविले गेले. प्रजेनं आपल्या लाडक्या राजाचे स्वागत केले. 
 
राजा कृष्णदेव राय ह्यांनी दुसऱ्या दिवशी राज्य सभेत सांगितले की हा  विजय मिळवणे माझ्यासाठी खूप खास आहे. या साठी  आम्हाला काही असे करावयाचे आहे जे कायमचे लक्षात राहील. एका मंत्र्याने राजा ला सल्ला दिला की आपण एक विजय स्तंभ बनवून घ्या.जो नेहमी आपली विजय गाथा सांगेल. राजाला हा सल्ला आवडला.
 
दुसऱ्या दिवशी त्यांनी राज मिस्त्री ला बोलविले आणि त्याला सांगितले की लवकरात लवकर विजय स्तंभ तयार करा. विजय स्तंभावर काम सुरू झाले लवकरच ते तयार झाले आता त्या वर नाकाशी चे काम राहिले होते. त्यावर कोरीव काम करायला सुरुवात झाली 
 
मिस्त्री ने दिवसरात्र एक करून काहीच दिवसात विजयस्तंभ उभारले.
एका खास दिवशी राजाने त्या विजय स्तंभाचे उद्घाटन केले.  त्या विजय स्तंभाला बघून सर्व आनंदित झाले. राजा ने राज मिस्त्रीला बोलवून म्हटले की तुम्ही काम खूपच छान केले आहे आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. आम्ही तुम्हाला काही बक्षिसे देऊ इच्छितो. सांगा आपल्याला काय पाहिजे . राज मिस्त्रीने नकार देऊन म्हणाला की महाराज आपल्या कृपेने माझ्याकडे सगळे काही आहे. मला काहीच नको. 
 
परंतु राजाच्या वारंवार म्हणण्यावरून त्याने राजाला सांगितले की महाराज मला आपण काही असं द्या की जे खूपच मौल्यवान असावं आणि त्याचे  मूल्य कधीच देता येणार नाही. असं म्हणत त्याने एक पिशवी त्यांच्या पुढे केली .
राजा विचारात पडले की अशी कोणती वस्तू आहे. ज्याचे मूल्य देता येणार नाही.
दुसऱ्या दिवशी त्यांनी राज मिस्त्रीला बोलावले.आणि तसेच सैनिकांना तेनालीरामला देखील बोलवायला सांगितले. सैनिक तेनालीरामकडे गेले आणि त्यांना घडलेले सर्व सांगितले 
तेनाली दरबारात राज मिस्त्रीसह उपस्थित झाले आणि राजाने तेनालीला घडलेले सांगितले तेव्हा तेनाली म्हणाले की महाराज मला हे माहीत होते म्हणून मी माझ्या बरोबर ती मौल्यवान वस्तू घेऊन आलो आहोत. तेनालीने मिस्त्रींची ती पिशवी घेतली तिला उघडली आणि नंतर परत बंद करून मिस्त्रीला परत दिली मिस्त्री ती पिशवी घेऊन आपल्या घरी निघून गेला.
 
राजाने तेनालीरामला विचारले की आपण मिस्त्रीला रिकामी पिशवी दिली आणि तो ती घेऊन गेला देखील . तेनाली म्हणाले महाराज मी त्या मिस्त्रीला रिकामी पिशवी दिली नाही मी त्याला त्यामध्ये हवा भरून दिली. जी या जगात सर्वात मौल्यवान आहे. त्याचे कोणी  काहीही मूल्य लावू शकत नाही. राज मिस्त्री ला देखील हे समजले म्हणून तो पिशवी घेऊन निघून गेला. राजाने तेनालीच्या बुद्धिमत्तेचे खूप कौतुक केले.
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

पुढील लेख
Show comments