Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या सुखी वैवाहिक जीवनात,या 4 चुका करू नका नातं बिघडू शकतं

Webdunia
बुधवार, 23 जून 2021 (09:00 IST)
लग्नासाठी प्रत्येक व्यक्तीचे काही स्वप्न असतात.लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्यच बदलत.एक नवीन जबाबदारी सांभाळायची आणि घ्यायची असते.लग्नानंतर जोडपे एकमेकांसह सुखी आणि आनंदात वैवाहिक जीवन घालविण्याचे स्वप्न बघतात.परंतु बऱ्याच लोकांचे हे स्वप्न भंग होतात.लग्नाच्या काहीच वर्षानंतर त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनात काही कारणांमुळे मतभेद होतात आणि ते मतभेद विकोपाला जाऊन त्यांच्या नातात दुरावा येतो.बऱ्याचवेळा या मतभेदामुळे लग्नासारखं पवित्र नातं तुटतं.
 
असं होऊ नये पती-पत्नीचं हे प्रेमळ नातं घट्ट असावे,यासाठी या 4 गोष्टींना करणे टाळा.जे मतभेदाला आणि नातं दुरावण्यासाठी कारणीभूत आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
 

1 जोडीदाराला दुर्लक्षित करणे-बऱ्याच वेळा काही लोक लग्नाच्यापूर्वी आपल्या जोडीदारासह भरपूर वेळ घालवतात.परंतु लग्नानंतर ते आपल्या जोडीदाराकडे कमी लक्ष देतात.त्यांना पुरेसा वेळ देत नाही.बऱ्याच वेळा कामाच्या व्यस्तपणामुळे तर काही वेळा इतर कारणांमुळे ते आपल्या जोडीदाराला वेळ देत नाही.त्यामुळे दोघात भांडण होतात आणि या भांडणांचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर पडतो.   
 

2 जुन्या सवयींना घेऊन बोलणे-बऱ्याच लोकांची स्वयं असते,की भांडण किंवा मतभेद झाल्यावर ते जोडीदाराच्या जुन्या सवयींबद्दल बोलणे सुरु करतात.वाद करताना जुन्या सवयींना घेऊन बोलणे टाळा.असं केल्याने आपला जोडीदार दुखावू शकतो आणि आपले नाते दुरावू शकतात.असं करणे टाळा.जुन्या गोष्टीना विसरा. त्यांना उजाळा देऊ नका. 
 

3 संशय करणे-बऱ्याचवेळा सुखी वैवाहिक नातं संशयामुळे देखील तुटते.संशय असा कीटक आहे ज्यामुळे आपले सुखी वैवाहिक जीवन क्षणातच पोखरू शकते. 
बऱ्याच लोकांचा स्वभाव शंकेखोर असतो.ते प्रत्येक लहान लहान गोष्टींवर संशय घेतात.या मुळे नात्यात दुरावा येतो.आपल्या जोडीदारावर कोणत्या ही पुराव्या शिवाय संशय घेऊ नका.या मुळे आपलं नातं सुधारत नाही तर नात्यात बिघाड येतो.
 
4 निंदा नालस्ती करणे-पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असत.म्हणून आवश्यक आहे की एकमेकांवर विश्वास करा.परंतु बऱ्याच लोकांची सवय असते की ते आपल्या जोडीदाराची निंदा नालस्ती आपल्या कुटुंबीयांकडे,मित्रांकडे करतात.परंतु आपण त्यांची निंदा नालस्ती इतरांकडे करता हे त्यांना कळल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या नात्यावर पडतो.म्हणून असं करू नका. 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments