Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा

डॉ. छाया मंगल मिश्र
शुक्रवार, 5 मार्च 2021 (15:48 IST)
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे नेहमीच मला आकर्षित करतात. विशेषत: काहीतरी नवीन, काहीतरी चांगले, इतरांसाठी नकारात्मकत असलेल्यातून स्वत:साठी काही सकारात्मक विचारसरणी, जी सर्वांसाठी प्रेरणा आणि उदाहरण बनेल. असेच एक उदाहरण म्हणजे 'केतकी जानी'.
 
आपल्या देशात जिथे कोणतेही काव्य, शेर, कविता, कहाण्या, प्रेम गीत, उपन्यास, इतिहास यात स्त्रियांच्या सौंदर्यांचे वर्णन तिच्या लांब-सडक, जाड, ​​रेशमी, चमकदार, कुरळे केसांशिवाय शक्य होत नाही. ज्यात सुंदर केसांमध्ये कधी प्रियकाराचं हृदय अडकतं तर कधी ते सावली देतात तर कधी चंद्र रात्रीत काळे भोर पसरतात. 
 
एखाद्या शायरची लेखणी केसात या प्रकारे अडकते जसं चंद्र वादळात लपतं. प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपल्या प्रेयसीच्या केसांच्या बटाखाली झोपायचं असतं त्यांना सावरायचा असतं त्यासोबत खेळायचं असतं. अजून काय-काय माहित नाही? त्याच वेळी, केतकीने केस नसतानाही आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपले सौंदर्य अनेकपटीने उजळ केले.
 
अहमदाबादमध्ये जन्मलेल्या 49 वर्षांच्या केतकीच्या आयुष्यात २०१० पर्यंत सर्व काही सामान्य होते, ज्याप्रकारे सर्वांचे जीवन सुखी असतं. परंतू अचानक ती 'अलोपेसिया' नावाच्या आजाराचा बळी पडली, ज्यामध्ये टाळूचे केस अचानक गळू लागतात आणि टक्कल पडते. डॉक्टरांनी तिला स्टिरॉइडच्या गोळ्या दिल्या ज्याचे बरेच दुष्परिणाम होते. त्याचा थेट मूत्रपिंडावर परिणाम होतो.
 
ही कहाणी फक्त केतकीची नव्हे तर त्या असंख्य स्त्रियांची आहे ज्यांचे जीवन केवळ केसच नव्हे तर समाजद्वारे स्त्रियांसाठी निर्धारित करण्यात आलेले सौदर्यांच्या मानकावर स्वत:ला मोजण्यात आत्मग्लानि व हीनभावना जाणवते.
 
न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटी, हाँगकाँग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी आणि टिआंजिन युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय गटाने केलेल्या एका शोधात म्हटले आहे की हे आतापर्यंतचं सर्वात विस्तृत अध्य्यन आहे, जे शरीराच्या रचनेमुळे स्त्रियांच्या सौंदर्यावर किती परिणाम होतो यावर आधारित आहे.
 
या अभ्यासामध्ये सामील प्रोफेसर रॉब ब्रूक्स म्हणतात की सौंदर्य विषयावर केलेले बहुतेक अभ्यास छाती, कंबर आणि नितंबांवर आधारित आहे परंतु आपल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की बाजूंची लांबी आणि रुंदी देखील सौंदर्य दृष्टीने मानक आहे. हे संपूर्ण शरीराच्या रचनेत आणि वजनात वेगळंच महत्त्व प्रदान करतं. या अभ्यासामध्ये असेही म्हटले आहे की बॉडी मास इंडेक्स आणि हिप-टू-कमर रेशो ही कोणत्याही महिलेच्या आकर्षणाचे सर्वात मोठे प्रमाण आहे.
 
माझे मित्र नरेंद्र तिवारीजी म्हणतात, 'जीवन हे बर्‍याच पींडांचे संग्रह आहे, त्या पीड्यांवर स्मितहास्य आहे'. हे देखील जीवनाचे सार आहे. केतकीला या विपत्तीच्या संग्रह असलेल्या जीवनाचा सापळाही कापावा लागला. वयाच्या 40 व्या वर्षी तिला आपलं आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले.
 
तिने ठरवलं होतं की आता आपण कधीही घराबाहेर पडणार नाही. बाहेरील जगाशी सर्व संबंध तोडून ती तीन वर्षांपर्यंत तीव्र नैराश्याला बळी पडली. तिची स्थिती कोणालाही कळावी असे तिला वाटत होते. त्यामुळे ती घरी बसून काहीही न करता फक्त रडायची.
 
या तीन वर्षात तिच्यावर अनेक उपचार केले गेले. परंतु या आजारावर कोणताही इलाज नव्हता. दोन अत्यंत प्रेमळ मुलांची आई आणि पतीची पत्नी केतकीने शेवटी आपली अशी अवस्था पाहून शांतता मोडून स्वत:ला समजावून सांगितले की तिचे संपूर्ण आयुष्य तिची वाट बघत आहे. जग तिच्याविषयी काय विचार करतो याचा विचार करायचा नाहीये. बाहेर पाऊल टाकून आपल्या सौंदर्यास आलिंगन द्यावं. आपल्याला केस नसले तरी आपण सुंदर आहोत. 
 
हे खरोखर तिच्या आयुष्यातील एक सुंदर टर्निंग पॉईंट होता आणि तिने स्वत: ला या रुपात स्वीकारण्याचे ठरविले. यात तिच्या मुलीचा मोठा हात होता. आपण कल्पना करू शकतो की जेव्हा एखादी स्त्री टक्कल डोक्याने बाहेर पडते तेव्हा तिला कशा प्रकारे लोकांच्या प्रतिक्रियांना तोंड द्यावं लागतं. जणू प्रत्येक चेहरा विचारत आहे की, कर्करोग आहे का? किंवा तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आलात आहात का? तिने सर्व प्रश्नांकडे हसून दुर्लक्ष केले.
 
पण केतकीने तिच्या इच्छेनुसार डोक्यावर टॅटू बनवले आणि असा विचार केला की जर देवाने मला कोरा कॅनव्हास दिला असेल तर मग ते का वापरू नये. वर्षभरापूर्वी तिला मिसेस इंडिया वर्ल्डवाइड स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि त्यात तिने आपले नाव नोंदवले. सुदैवाने तिने तिन्ही राउंड पार पाडले आणि 3000 हून अधिक स्पर्धकांना मागे टाकून टॉप 15 निवडली गेली.
 
काही वर्षांत केतकीच्या विचारत 'why me' ते 'why not me?' असा बदल झाला. तीन वर्षांच्या नैराश्यातून स्वत:ला घरात कोंडून ठेवण्यापासून ते मिसेज इंडिया वर्ल्डवाइडपर्यंतचा प्रवासात जगाला सामोरा जायचं हीच केतकीची कहाणी आहे. यावर तिच्या कुटुंबाला अभिमान आहे.
 
लंडनमधील 'डोव्ह रिसर्च सेंटर'च्या वृत्तानुसार, जगभरातील स्त्रियांमध्ये सौंदर्य आणि शारीरिक बनावट याबद्दल स्त्रियांमध्ये हीनभावना आणि आत्मविश्वासाची अत्यंत कमतरता आहे, परंतु आम्ही भारतीय महिला अपवाद आहोत. हे संशोधन 10-17 आणि 18-64 वर्षे या वयोगटातील महिलांवर होते. हीन भावनेमुळे आनंद आणि निर्णय घेण्याच्या पातळीवर देखील प्रचंड प्रभाव पडतो.
 
2010 मध्ये अमेरिकेसारख्या विकसित देशात, आत्मविश्वासाने महिलांची टक्केवारी 85% होती, ती 2016 मध्ये घटून 50% झाली. अमेरिका, कॅनडा आणि यूके सारख्या खुल्या समाजांमधील महिलांपेक्षा कमी खुल्या भारतीय समाजातील महिला जास्त आत्मविश्वास बाळगतात कारण त्यांच्यात शारीरिक हल्ल्यांचा आणि मानसिक दबावाचा सामना करण्याची क्षमता आहे.
 
इतकेच नाही तर सौंदर्याबरोबरच महिलांवरही 'सर्वगुण संपन्न अर्थात अष्टपैलू' होण्याचा खूप दबाव असतो. केवळ भारतच नाही तर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आणि जर्मनीसारख्या लैंगिक भेद या पलीकडे समानता आणि स्वातंत्र्य असणारे अनेक देशदेखील या विचित्र मानसिकतेने ग्रस्त आहेत. या संशोधनात असेही म्हटले आहे की भारतातील 96 % महिलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विश्वास आहे.
 
यासाठी अनेक कारणांपैकी एक सर्वात हैराण करणारं कारण म्हणजे नवीन पिढीच्या मुली शांतपणे आपल्या आईकडून धडे घेतात. केवळ आपल्या शरीरा कायेच्या बळावर आत्मविश्वास होण्याऐवजी, आपल्या करिअर आणि कौशल्यांबद्दल अधिक जाणीव ठेवतात.
 
देशातील पहिली अ‍ॅलोपियन सर्व्हाइव्हर आणि मॉडेल, केतकी यांनी स्वत:चं मुकुट आपल्या इच्छेचे हिरे रुजवून तयार केलं. मिसेज प्रेरणा, मिसेस पॉपुलर, मिसेस पीपल्स चॉईस, मिसेस युनिव्हर्स वुमन ऑफ कॉन्फिडंट 2018 फिलीपीन्स सारखे किताब आपल्या नावावर करणारी केतकी आपल्या दोन मुलांवर तसेच प्राण्यांवर प्रेम करणारी स्त्री आहे. ‍ती आपल्या दोन्ही कुत्र्यावर खूप प्रेम करते.
 
भारत प्रेरणा अवॉर्ड, वूमन ऑफ वोर्दिनेस, उद्गम अवॉर्ड, इंस्पायरिंग वूमनहुड द वी अवॉर्ड, ज्वेल ऑफ इंडिया या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत त्यांना 2020 मध्ये सोशल अवेयरनेस यासाठी सन्मानित केले गेले. 
 
केतकी त्या सर्वांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायक आहे ज्यांनी आपले आयुष्य कोणत्याही कमतरतेमुळे नष्ट केले आहे. केतकी आपल्या आत्मविश्वासाचा मुकुट स्वत: आपल्या डोक्यावर घेऊन मिरवते.
 
कोणत्याही देशात महिलांसाठी बनवण्यात आलेले सामाजिक सौंदर्याचे प्रमाण त्या देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या सर्जनशीलता, आरोग्य, उत्पादन क्षमता, आनंद, जगण्याची इच्छा आणि आत्मविश्वास यावर खूप अधिक प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकतात. आम्हा स्त्रियांना आपल्या श्रेष्ठ प्रदर्शन आणि आनंदासाठी, आपल्या वतीने मुक्तपणे जगण्यासाठी हे मापदंड स्वतः बदलले पाहिजेत.
 
आपले जीवन, आपले सौंदर्य, आपली इच्छा, आपला हक्क ...!

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

पुढील लेख
Show comments