Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माउलीची महत्ता

Webdunia
आताची पिढी भाग्यवंतच म्हटली पाहिजे. मातृदिन, पितृदिन यासारखे वार्षिकोत्सव आमच्यावेळी नव्हते. कारण प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी मातृ-पितृदिन असे. शालेय अभ्यासक्रमांमधून, कथाकीर्तनांमधून, जात्यांवर गायल्या जाणार्‍या ओव्यांमधून वात्सल्यसिंधू, करुणामूर्ती, कर्तव्यकठोर माता आम्हाला भेटत गेल्या. त्यामुळे स्वत:च्या आणि इतरांच्याही मातांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन निकोप होत गेला. मातेप्रती असणार्‍या कर्तव्याची जाणीव होत गेली. काळीआई, गोमाता, मातृभाषा आणि मातृभूमी याही जन्मदात्री इतक्याच वंदनीय असतात. कवी कौस्तुभ यशवंत यांची प्रेमस्वरुप आई ही प्रसिध्द कविता पूर्वी तोंडपाठ असाची. त्याचबरोबर चिलिया-चांगुणाची, राजपुत्राला वाचविण्यासाठी पोटचे पोर बळी देणार्‍या पन्नादाईची कथा ऐकताना मनाची कोण घालमेल होत होती. उच्च दर्जाच्या समाजव्यवस्थेत अशा माता निपजतात आणि अशा मातांमुळे समाजाला, राष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. शिवराय घडवायचे असतील तर जिजाऊ जन्माला याव्या लागतात आणि शिवरायांच्या जन्मामुळे जिजाऊंना महामातृत्व लाभत असते. नेते-अभिनेते आणि क्रिकेटपटू ज्या समाजाचे आदर्श असतात त्या समाजात ना जिजाऊ जन्म घेतात ना शिवराय. आज नेमके काय बिघडले आहे याचा सर्वानीच गांभीर्याने विचार केला तर येत्या रविवारी साजरा होणारा जागतिक मातृदिन काही प्रमाणात सार्थकी लागेल.
 
सोमनाथ देशमाने, अहमदनगर

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

पुढील लेख
Show comments