Dharma Sangrah

ठाण्यात रिक्षाचालका कडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (23:54 IST)
राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवला असून राज्यात महिलांच्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील ठाण्यात महिलेच्या सुरक्षेच्या प्रश्न उदभवला आहे. ठाणेच्या स्टेशन परिसरातून एका विद्यार्थिनींची रिक्षाचालकाने छेड काढून तिला फरफटत नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली असून या घटनेत मुलगी जखमी झाली आहे.  घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक फरार झाला असून त्याचा अजून शोध लागलेला नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने एका विद्यार्थिनींची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यावर तिने रिक्षाचालकाची कॉलर धरून त्याला जाब विचारला नंतर रिक्षा चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशामध्ये पीडित मुलगी फरफट ओढली गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मुलगी जखमी झाली आहे. 
महिलांच्या सुरक्षे बाबत प्रश्न निर्माण झाले असून राज्य सरकारने यावर योग्य पाऊले उचलून 
महिलांचा सुरक्षेसाठी काही निर्णय घेण्यात यावे अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा   रुपाली चाकणकर यांनी  केली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या बाबत कडक कारवाई  करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहे.   

गर्दीच्या ठिकाणी आणि कॉलेज परिसरात पोलिसांचं गस्त वाढवूंन महिलांचा सुरक्षेला प्राधान्य देणं हे महत्त्वाचं असल्याचं  ते म्हणाले. घटनेची माहिती मिळतातच मुलीच्या पालकांनी  आणि नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. अद्याप आरोपी रिक्षा चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments