Marathi Biodata Maker

आदित्य ठाकरे यांनी मनसेची उडवली खिल्ली, म्हणाले मनसे केवळ टाइमपास टोळी

Webdunia
गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:40 IST)
मनसे ही केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका  पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Ashadhi Wari 2026 Schedule आषाढी वारी 2026 चे वेळापत्रक जाहीर

Squash: उपांत्यपूर्व फेरीत अभय सिंग-वेलवन सेंथिलकुमार यांनी शुभम आणि वेदांत यांच्या जोडीचा पराभव

LIVE: मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात होणार, बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिला

इराणने अणुशक्ती बनू नये, अशी चीनचीही इच्छा, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

मुंबईत चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा: टरबूज नाही तर उंदीर मारण्याच्या विषाने मृत्यू, शवविच्छेदन अहवालामुळे खळबळ

पुढील लेख
Show comments