Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (22:26 IST)
मुंबई : ड्रग्स प्रकरणाला दररोज नवीनच खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आल्याने समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. तर काही दिवसांपासून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही वानखेडेवर आरोप करीत आहेत. नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जंयत पाटील  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असं देखील वळसे-पाटील सांगितलं आहे. तर, प्रभाकर साईलचं 
प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहितीही वळसे-पाटील यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments