Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 1078 नवीन कोरोना रुग्णांचे निदान

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (08:57 IST)
राज्यातील कोरोना बाधित  रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. सोमवारी (दि.1) राज्यातील कोरोनाची आकडेवारी  हजाराच्या आली असताना आता  यामध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर मंगळवारी  राज्यात 10 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली होती. मात्र,यामध्ये मोठी वाढ झाली आहे. रुग्ण वाढत असताना बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 15 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात  1078 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1095 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 लाख 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.59 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 48 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 274 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात (Coronavirus in Maharashtra) 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 28 लाख 43 हजार 792 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 12 लाख 965 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 497 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 919 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments