Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पनवेलला जायचं होतं पण कल्याणला पोहचली, हायटेक वंदे भारत ट्रेन कशी रस्ता चुकली? रेल्वेने दिले कारण

How the high-tech Vande Bharat train lost its way
Webdunia
मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (09:38 IST)
Mumbai News: सध्या सोशल मीडियावर गोवा वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. तसेच गोव्याला जाणारी वंदे भारत ट्रेन कल्याणमध्ये पोहोचल्याचे बोलले जात आहे. आता स्वत: रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून मार्ग वळवावा लागल्याची चर्चा आहे.
ALSO READ: अखिलेश यादव यांनी वंदे भारत ट्रेनबाबत सरकारवर टिप्पणी केली
मिळालेल्या माहितीनुसार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत ट्रेन आपल्या नेहमीच्या मार्गापासून गेली होती. दिवा स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बिघाडामुळे गाडी पनवेल स्थानकाचा मार्ग न घेता कल्याण मार्गावर गेली आणि वंदे भारत 90 मिनिटे उशिराने गोव्यात पोहोचली. तसेच ही गाडी कल्याण स्थानकात सकाळी सात वाजता पोहोचली. त्यानंतर ती पुन्हा दिवा स्थानकाकडे वळवण्यात आली, जिथे ती सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी  पोहोचली. आता या बातमीकडे लोकांचे लक्ष लागले कारण वंदे भारत ही ट्रेन वेळेवर पोहोचते, अशाप्रकारे 90 मिनिटे उशिरा पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या ट्रेनचा वेगही सामान्य गाड्यांपेक्षा जास्त आहे.
ALSO READ: या महिलांना मिळणार नाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ! सरकारच्या नवीन अटी जाणून घ्या
मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितले की, सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे पॉईंट क्रमांक 103 वर काही तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा जंक्शनवर सकाळी सुमारे 35 मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

LIVE: आदित्य ठाकरेंनीही केला कुणाल कामराचा बचाव

स्टुडिओमध्ये तोडफोड करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची संजय राऊतांची मागणी

एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments