Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो: पालकमंत्री अस्लम शेख

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:53 IST)
महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आली असून फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे आणि याच पार्श्वभूमी रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
 
अस्लम शेख यांना सूचक वक्तव्य करत म्हटले की लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आणि म्हटले की तरी लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. त्यांनी म्हटले रुग्णसंख्या वाढत आहेत, आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही जेथे याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे त्या हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आहे. रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यास मनाई आहे. तसेच लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असली तरी तेथे शेकडो लोक पोहचत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये यासाठीच हा प्रयत्न आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments