Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कलम 144 लागू, सार्वजनिक ठिकाणी नववर्ष साजरे करता येणार नाही

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (08:26 IST)
मुंबईत कोरोनाव्हायरस ओमिरकॉन व्हेरिएंट केसेसच्या नवीन प्रकाराचा धोका लक्षात घेता, मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे औचित्य साधून साजरे होत असताना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकारांची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातच आढळून आली आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे 16 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या 42 टक्के ओमिक्रॉन केसेसचा प्रवासाचा इतिहास नसल्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. जेथे कलम 144 लागू आहे, तेथे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
 
मंगळवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकारांची 8 नवीन प्रकरणे नोंदवली गेली . महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले की, राज्यात संसर्ग झालेल्या आठ ओमिक्रॉन रुग्णांपैकी कोणीही अलीकडे परदेशात प्रवास केलेला नाही. आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, नवीन प्रकरणांसह, राज्यात SARS-CoV-2 च्या नवीन स्वरूपाची लागण झालेल्या लोकांची संख्या 28 झाली आहे. त्यापैकी मुंबईत सात रुग्ण आढळले असून बाधितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख