Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,पुण्याला ऑरेंज अलर्ट

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (08:05 IST)
मुंबईसह चार जिल्ह्यांना  पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. तसेच, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
 
मुंबई,ठाणे आणि पालघरसाठी 19 जुलै ते 22 जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे. तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांसाठी 19 जुलैसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर 20 जुलैपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
येत्या 24 तासांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यासोबतच काही भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहतील अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई तसेच परिसरासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठीही 18 जुलैचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments