rashifal-2026

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (17:10 IST)
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन या दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. दरम्यान ही हत्या कोणत्या कारणामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही.
 
या घटनेत, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. नरेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बारचे कर्मचारी होते.
 
या बारच्या मालकाने गुरुवारी रात्री 10.30 वा. याबाबतची माहिती मीरारोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्या दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. तसेच या दोन्ही मृतदेहांच्या डोके आणि शरीरावर जखमा आढळल्या. दरम्यान मीरा रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments