Festival Posters

पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार, तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:13 IST)
राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता हा पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
 
ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments