Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार, तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:13 IST)
राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता हा पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
 
ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

पुढील लेख
Show comments