rashifal-2026

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (21:48 IST)
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील नदी परिसरात तसेच उल्हासनगर व कल्याण तालुक्यातील नदीच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.
 
उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेजमधील पाणी पातळीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी असून आता बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीच्या वर १७.२० मीटर इतकी झाली आहे. जांभूळ बंधारा येथील नदीची इशारा पातळी १३ मीटर असून सध्या येथे धोका पातळीच्या वर १४.५७ मीटर इतकी पाणी पातळी आहे.
 
कल्याण तालुक्यातील मोहने बंधारा येथे नदीची इशारा पातळी ९ मीटर असून सध्या येथे ०९.३३ मीटर इतकी पाणी पातळी आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ५१ धावांनी पराभव केला

लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक शोषण? बांगलादेशी खेळाडूवर गंभीर आरोप; आरोपपत्र दाखल

जपान ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले

LIVE: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

मुंबई : १५ डब्यांच्या लोकल ट्रेन लवकरच धावणार; पश्चिम रेल्वेने विस्तारीकरणाच्या कामाला गती दिली

पुढील लेख
Show comments