Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:16 IST)
नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात  करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट शहवासीयांवर आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 20 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र काही भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विभागवार आठवड्यातून एकवेळ संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून ऐरोली भागातून सुरू होणार आहे.
 
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून आणि एमआयम्डीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मोरबेतून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण एमआयडीसीतून 80 दशलक्ष लीटरऐवजी 60 ते 62 दशलक्ष लीटर पुरवठा होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सुरळीत पाणी देण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments