Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांकडे वाकड्या नजरेने पाहू नये : आदित्य

Webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (16:00 IST)
महिला ही जननी आहे. तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये. शाळेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धडे देणे आवश्यत आहे. महिलांना व्यापक प्रमाणात स्वसंरक्षणाचे धडेही दिले गेले पाहिजेत, अशी भूमिका पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षेसंदर्भात मांडली आहे.
 
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिला सुरक्षेवर चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना आदित्य  यांनी अत्यंत कळकळीने आपले विचार मांडले. महिलांच्या सुरक्षेवर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्तीत जास्त बोलायला हवे, असे नमूद करत आदित्य यांनी महिला सुरक्षा ते महिला सबलीकरण अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर विधिमंडळात किमान दर तीन महिन्यांनी चर्चा व्हाला हवी. त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बोलण्याची संधी दिली पाहिजे. महिला महिलेबद्दल काळजीनेच बोलणार मात्र पुरुष त्यावर कसे बोलतात, हे ऐकण्यासारखे असेल, असे आदित्य म्हणाले.
 
तसेच ती आई आहेच शिवाय नर्स, शिक्षिका, मुख्याध्यापक, प्राध्यापिका, प्राचार्यही प्रामुख्याने महिलाच असतात. अशाप्रकारे आयुष्यातील महत्त्वाच्या प्रत्येक पारीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने महिलांचेच संस्कार आपल्यावर घडत असतात. त्यानंतरही असे नक्की कोणते पुरुष आहेत जे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहतात ते हुडकायला हवे. हा मोठा विषय असून याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे आदित्य म्हणाले. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा व्हायला हवा, असे आपण सगळेच बोलत आहेत. पण प्रत्यक्षात शिक्षेवर बोलतानाच महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचारच होणार नाही, यावरही बोलण्याची, सखोल विचार करण्याची गरज असल्याचे आदित्य यांनी नमूद केले.
 
शालेय अभ्यासक्रमात अगदी चौथीपासून 'राइट टच', 'राँग टच' काय असते हे शिकवायला हवे. महिलेवर कुठे अत्याचार होत असेल तर महिलेने कालीमातेचे रूप धारण करायला हवे, असे आवाहनही आदित्य यांनी केले.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments