Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, विमानात 54 प्रवासी होते

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (15:58 IST)
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील डुमना विमानतळावर आज एअर इंडियाचे विमान अपघातातून बचावले. दिल्लीहून येणारे हे विमान विमानतळावर उतरत असताना नियंत्रणाबाहेर गेले. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. नंतर वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे  विमान पुन्हा धावपट्टीवर आणण्यात यश आले. विमानात 54 प्रवासी होते. दिल्लीहून जबलपूरला येणारे एअर इंडियाचे विमान ई-6 दुपारी जबलपूरच्या डुमना विमानतळावर पोहोचले होते.
 
धावपट्टीवर उतरत असतानाच विमान धावपट्टीवरून नियंत्रणाबाहेर गेले. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली आणि प्रवासी घाबरले. 

हा अपघात कसा झाला, याचा तपास केल्यानंतर वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे  विमान कसेतरी धावपट्टीवर आणण्यात आले. विमानतळावर अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरण आणि अग्निशमन दलाचे लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमान धावपट्टीवरून कसे घसरले आणि अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे.

संबंधित माहिती

साडी नेसल्याने या कॅन्सरचा धोका वाढतो!

मतदानासाठी नोंदणी कशी करावी

राज ठाकरे म्हणाले मोदींनी देशाचे पंतप्रधान व्हावे हे सांगणारा मी पहिला माणूस होतो

संजय राऊत यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

RR vs GT:राजस्थान संघ गुजरात विरुद्ध सामना आज, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments