Marathi Biodata Maker

दहशतवादी हल्ल्याचे अरनाथयात्रेवर सावट

Webdunia
शनिवार, 16 जून 2018 (11:21 IST)
केंद्र सरकार रमजान ईद झाल्यावर दहशतवाद्यांविरोधात स्थगित करण्यात आलेली मोहीम सुरू करायची की नाही याबाबत विचाराधीन आहे. ही मोहीम स्थगित असतानाच एका सैनिकाला व एका पत्रकाराला ठार करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या हल्ल्याच्या कटामागे पाकिस्तान आहे असेही समजते आहे.
 
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्यासाठी कट रचत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 29 जूनपासून अरनाथ यात्रेला सुरुवात होते आहे.
 
रमजानच्या महिन्यात दहशतवातांविरोधात करण्यात येणार्‍या कारवाईच्या मोहिमांना स्थगिती देण्याचा नेमका काय परिणाम झाला याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अमरनाथ यात्रेबाबत आणि या यात्रेची सुरक्षा वाढवण्यासंबंधीही विचारविनिमय झाला. अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट आहे अशात मेहबूबा मुफ्ती सरकारने केंद्राकडे 22 हजार अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करावी अशीही मागणी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments