Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Assam flood: आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 2 लाख लोक बाधित

Webdunia
बुधवार, 18 मे 2022 (11:05 IST)
एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांशी रस्ते आणि रेल्वे संपर्क मंगळवारी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विस्कळीत राहिला. 
 
आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रुळ वाहून गेले आहेत. आसामला पुराचा फटका बसला असून आतापर्यंत 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोक प्रभावित झाले आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यंदा ईशान्येकडील राज्य पुराच्या विळख्यात आहे. पुरामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही हळूहळू वाढ होत आहे. 
 
मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि पाणी साचल्यामुळे राज्यातील डोंगराळ भागात रेल्वे ट्रॅक, पूल आणि रस्ते दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या अनेक भागांतील लोकांना समस्या निर्माण झाल्या आहेत.
 
आसामच्या जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांचा उर्वरित राज्यापासून संपर्क तुटला आहे कारण रस्ते आणि पूल भूस्खलनामुळे एकतर बंद झाले आहेत किंवा वाहून गेले आहेत. या भागातील दळणवळण वाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत.
 
राज्यातील एकूण 811 गावांना पुराचा फटका बसला आहे, तर 1,277 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे आणि 5,262 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेकांना घरे सोडावी लागली आहेत आणि त्यांनी शाळा आणि उंच भागात आश्रय घेतला आहे. 
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments