Dharma Sangrah

राम मंदिर प्रश्नासाठी न्यायालयावर अवलंबून राहू नका - सर संघचालक

Webdunia
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:30 IST)
राम मंदिर प्रश्नी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका स्पष्ट केली असून, राज्य देश हे फक्त कायद्याने नव्हे तर नागरिकांच्या भावनांवर चालत असते, त्यामुळच राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील जनतेला एकत्रपणे उभे राहण्याची हाक दिली असून, राम मंदिराचा पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी लोकांनी बराच काळ धीर धरला आहे, आता मात्र,ती वेळ गेली असून, राम मंदिराच्या उभारणीसाठी जनआंदोलन करायची गरज असल्याचे मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोणताही देश हा कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. त्यामुळे न्यायालयाने जनतेच्या भावना विचारात घेणे गरजेचे आहे.मात्र योग्य निवडा न देता न्यायालय सतत आपला निर्णय पुढे ढकलत आहे तेव्हा निर्णय जनतेने घ्यावा असे देखील भागवत यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments