कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पूराचं संकट आलं आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती झाली आहे. आसाममधील पुरामुळे हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आतापर्यंत ३८,००० लोकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन अहवालानुसार राज्यातील पूरात मृत्यू झालेल्यांपैकी एकूण मृतांची संख्या १२ झाली आहे.
दिब्रुगडमधील सीआरपीएफ मुख्यालयातही पुराचं पाणी शिरलं आहे, त्यामुळे सैनिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सैनिकांच्या खोल्यांमध्ये पाणी शिरलं आहे.