Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानकडून गोळीबार, कोल्हापूरचा जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद

Webdunia
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:08 IST)
काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात असून, शनिवारी सकाळी पाक लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम  शिवाजी पाटील (वय ३५) शहीद झाले.
 
शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवाशी असून, अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

पुढील लेख
Show comments