Marathi Biodata Maker

रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल; जूनपासून लागू होणार

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (15:52 IST)
सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. 
 
केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. हे वितरण पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल.
 
मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. या बदलानंतर यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही.
 
तसेच दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. 
या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments