Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर

Webdunia
बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:04 IST)
आता बिहारमधील 'राष्ट्रीय लोक समता पार्टी'चे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देताना एनडीएतून ते बाहेर पडलेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.२०१९ची लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा सहभाग असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीत जाण्याचा पर्याय आपल्यासमोर आहे, असे उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सांगितले.
 
मोदी सरकारने बिहारसाठी जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. बिहारसाठी विशेष पॅकेज देण्याचे जाहीर केले होते, पण आमच्या राज्याच्या पदरात काहीच पडले नाही. शिक्षण आणि आरोग्याच्याबाबतीत बिहारची हीच स्थिती आहे. आपली घोर निराशा केलेय. तसेच मागासवर्गीय समाजांचा घोर विश्वासघात केलाय. बिहार या आमच्या राज्याला केवळ भुलथापा दिल्यात. मोदी सरकारने काहीही केलेले नाही. केवळ नावापुरते मंत्रीपद दिल्याचा आरोप उपेंद्र कुशवाह यांनी यावेळी केला.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments