Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नक्षलवाद्यांनी सुमारे तीन कोटीची वाहने जाळली

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (16:13 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी ढिगभर वाहने पेटवून दिली. यात जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची वाहने जाळली आहे. यामध्ये दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टर आणि एक कार जळून खाक झाली.
 
गेल्या सहा महिन्यांपासून एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याला नक्षलवाद्यांनी वारंवार विरोध दर्शवला. याआधी रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना माओवाद्यांनी धमकावलं होते. 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी मजुरांना बंदी बनवत, रस्त्याच्या कामासाठी आणलेली सर्व वाहने जाळून टाकली. या वाहनांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.
 
या मार्गावरुन छत्तीसगडची सीमा सुरु होते. जर हा रस्ता तयार झाला, तर नक्षलवाद्यांना समस्या निर्माण झाल्या असत्या. तसेच याच कच्च्या रस्त्यावरुन नक्षलवादी ये-जा करतात. जर पक्का रस्ता झाला तर नक्षलवाद्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. याच कारणामुळे नक्षलवाद्यांकडून वाहनं जाळण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments