Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य असणार

Webdunia
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:08 IST)
देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आता २०१९ सालापासून शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य असणार आहे. तसेच मुलांवरील अभ्याक्रमाचा बोजा कमी करण्यासाठी यामध्ये ५० टक्के कात्री लावण्यातही येणार आहे. यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. 
 
या वर्षी खेळ हा अविभाज्य घटक असलेल्या २० शाळा केंद्राकडे असणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेला सात ते दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेत दोन ते तीन खेळ अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे विशिष्ट खेळावर लक्ष केंद्रित करता येईल, असे राजवर्धनसिंग राठोड यांनी आवर्जून सांगितले. रग्बी या खेळाची वर्ल्ड कप ट्रॉफी भारतात आणली असून या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments