Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीतील वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय संतप्त, म्हणाले- सरकारने लॉकडाऊनसारख्या निर्णयावर विचार करावा

Webdunia
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (13:32 IST)
दिल्लीतील वायू प्रदूषणावर शनिवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली . न्यायालयाने केंद्र सरकारला लवकरात लवकर वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कल्पना आणण्यास सांगितले. सरकार लॉकडाऊनसारखी पावले उचलण्याचा विचार करू शकते.
 
सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी केंद्र सरकारला फटकारले आणि म्हटले की, अशा परिस्थितीत घरीही मास्क घालून बसावे लागेल, असे वाटते.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 70 टक्के प्रदूषणाला जबाबदार कोण? 500 च्या पुढे गेलेला AQI  कसा घसरेल?
 
सर्वांनीच  शेतकर्‍यांना दोष देण्याचे ठरवले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांनाच का जबाबदार धरले जात आहे, असा सवाल त्यांनी केला, दिल्लीत गेल्या 7 दिवसांपासून फटाके कसे जाळले जात आहेत आपण हे पहिले आहे का?
 
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर आहे . देशाची राजधानीने शनिवारी हंगामातील सर्वात वाईट AQI नोंदवला. शनिवारी सकाळी दिल्लीतील 24-तास सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 499 नोंदवला गेला, जो मोसमातील आतापर्यंतचा सर्वात वाईट आहे.
AQI शून्य ते 50 'चांगले', 51 ते 100 'समाधानकारक', 101 ते 200 'मध्यम', 201 ते 300 'खराब', 301 ते 400 'अतिशय गरीब' आणि 401 ते 500 'गंभीर' मानले जातात.
 

संबंधित माहिती

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

पुढील लेख
Show comments