Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनसोबतच्या चकमकीच्या मुद्द्यावर राजनाथ यांचे संसदेत उत्तर

चीनसोबतच्या चकमकीच्या मुद्द्यावर राजनाथ यांचे संसदेत उत्तर
, मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (18:14 IST)
भारत आणि चिनी लष्करातील चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभा आणि राज्यसभेत उत्तर दिले. ते म्हणाले की 9 डिसेंबर 2022 रोजी पीएलए गटाने (चिनी आर्मी) तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात एलएसीमध्ये अतिक्रमण करून एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नांना आपल्या सैन्याने निर्धाराने तोंड दिले. या चकमकीत दोन्ही बाजूंनी हाणामारीही झाली. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना धाडसाने अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले.

काही वेळातच आमच्या सैनिकांनी चिनी सैनिकांचा पाठलाग केला. या काळात आपला एकही सैनिक मरण पावला नाही. तसेच कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पीएलएचे सैन्य माघारी परतले. 11 डिसेंबर रोजी, भारताच्या स्थानिक लष्करी अधिकाऱ्याने पीएलएच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आणि या घटनेबाबत चर्चा केली. त्यांना सीमेवर शांतता राखण्यास सांगण्यात आले आहे. मी या सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य भारताच्या अखंडतेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याविरुद्ध कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी तयार आहेत. मला खात्री आहे की हे सभागृह भारतीय सैन्याला पाठिंबा देईल आणि त्यांच्या पराक्रमाला आणि शौर्याला सलाम करेल. 
 
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली . या बैठकीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. 
 
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या सैनिकांची वर्दळ दिसली. भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी सैन्याला माघार घेण्यास सांगितले आणि त्यांना पुढे येण्यापासून रोखले. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चकमक झाल्यानंतर लगेचच दोन्ही बाजू आपापल्या भागात परतल्या. चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून 20 सैनिक जखमी झाले, तर जखमी चिनी सैनिकांची संख्या दुपटीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या घटनेनंतर, भारतीय स्थानिक कमांडरने चिनी बाजूच्या कमांडरसोबत ध्वज बैठक घेतली आणि पूर्वनियोजित व्यवस्थेअंतर्गत शांतता आणि स्थिरता पुनर्संचयित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, तवांगमध्ये LAC चे काही भाग आहेत जिथे दोन्ही बाजू आपला दावा करतात आणि दोन्ही देशांचे सैनिक येथे गस्त घालतात. हा ट्रेंड 2006 पासून सुरू आहे.
Edied By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या फुटबॉल खेळाडूला फाशीची शिक्षा