Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीषण अपघात :अनियंत्रित बसने अनेकांना चिरडले

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:51 IST)
कानपूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात झाला. शहरातील व्यस्त चौक असलेल्या टाटमिल येथे एका अनियंत्रित इलेक्ट्रॉनिक बसने ट्रॅफिक बूथ आणि कंटेनरवर धडक देत अनेकांना चिरडले. या अपघातात 5 जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
 
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  बसने समोरून येणाऱ्या एका ट्रकलाही धडक दिली. अपघात झाला तेव्हा चौकाचौकात गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी त्याच्या विळख्यात सापडले आहेत.
 
यापैकी पाच जणांचा मृत्यूही झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. सध्या घटनास्थळी पोहोचलेले पोलीस बचावकार्यात गुंतले आहेत. अपघातात जखमीं झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरधाव वेगाने जाणारी बस टाटमिल चौकात येताच अनियंत्रित झाली. यानंतर बस विजेच्या खांबाला धडकली आणि समोर उभ्या असलेल्या वाहनांवर आदळली. धडकल्यानंतरही बस थांबली नाही आणि समोरून रस्त्यावरून येणा-या अनेकांना तुडवत गेली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

पुढील लेख
Show comments