Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगलेच नाहीत तर टॅक्स का भरला? सोमय्यांचा हल्लाबोल

Webdunia
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (10:42 IST)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर गंभीर आरोप केले. आता या आरोपांना किरिट सोमय्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 
 
पीएमसी बँक घोटाळा आणि सोमय्या कुटुंबाचा एक दमडीचाही संबंध नसून उद्धव ठाकरे सरकारने या आरोपाची चौकशी करावी, असे आव्हानही सोमय्यांनी दिले.
 
अलिबागमधील 19 बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला. जर बंगलेच नाहीत तर मग कर का भरला? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीने दिलेले कागदपत्र किरीट सोमय्यांकडून सादर करण्यात आले. तसेच वनखात्याच्या जमिनीवर घरं बाधल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर जोड्याने मारू असे संजय राऊत बोलले पण हे मला बोलताय की रश्मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलताहेत, असा टोला सोमय्यांनी लगावला आहे. कारण तेथे 19 बंगले आहेत की नाही हे पाहण्यासाठी रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांना घेऊन जा, असेही ते म्हणाले.
 
किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. या दरम्यान त्यांनी विचारले की कोव्हिड घोटाळ्याबाबत संजय राऊत एक शब्दही का बोलले नाहीत? माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी घाबरणार नाही. संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. 

संबंधित माहिती

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

पुढील लेख
Show comments